Caterpillar
तो भेटतो,आणि पहिल्याच भेटीत आपल्याला आवडू लागतो.त्याचं बोलणं,वागणं,हसणं,बसणं, त्याचा आवाज,त्याचा सहवास अगदी सर्व काही...आणि त्याच्याकडून सुद्धा त्याच भावना प्रतीत होऊ लागल्या की मग तर विषयच संपतो.हळू हळू संवाद वाढत जातो त्यातून भेटी जन्म घेतात.सर्व काही एवढ्या घाईत होतं की
"काही दिवसआधी अगदी अपरिचित असलेली व्यक्ती अगदी आपलं संपूर्ण आयुष्य होऊन बसते."
पण खरा परीक्षेचा काळ तेव्हा सुरू होतो,जेव्हा अपेक्षा वाढत जातात आणि आधी सर्व गुण संपन्न वाटलेल्या व्यक्ती मधे काही छोटे दुर्गुण सुद्धा असू शकतात हे मान्य करण्यासाठी मन तयार नसते.मग आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यापेक्षा हे आधी का समजलं नाही या प्रश्नावर अडकून राहतो.घुसमटतो,चिडतो,ओरडतो आणि मग
दरी अजूनच खोल होत जात वाढत जाते.
दरी अजूनच खोल होत जात वाढत जाते.
खरं तर नातं हे सुरवंटा प्रमाणे हळू हळू वाढायला हवं.त्यात जवळ येण्यासाठी धडपड असावी,रुसवा फुगवा असावा,एकमेकांना पूर्णपणे जाणून घेण्याची तयारी असावी आणि या सर्वांमध्ये सुद्धा नात्याचं फुलपाखरू झालं तरंच ते नातं टिकू शकतं.कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतो तेव्हा जरी फक्त चांगले गुण दिसत असले तरी नीट संवाद साधला तर त्याच्या आवडी निवडी कळू लागतात,त्यामागची कारण कळतात.आणि हे सर्व जसं आहे तसं जर आपल्याला मान्य असेल तरंच पुढचं पाऊल उचलण्यात काही अर्थ आहे.कारण आपण त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करणार असलो तर मग आपण पहिल्या क्षणात प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सुद्धा आपण गमावून बसतो.
मग ना मैत्री उरते ना प्रेम...
मग ना मैत्री उरते ना प्रेम...
Comments
Post a Comment